बिरसा मुंडा
कृषि क्रांती योजना
राज्यातील अनुसुचित
जमाती प्रवर्गातील ०.४० ते 6.०० हेक्टर पर्यंत वहिती क्षेत्र असलेल्या शेतक-यांना
सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा
मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. क्षेत्रीयस्तरावर सदर योजनेची
अंमलबजावणी जिल्हा परिषदांचा कृषि विभाग करीत आहे.
या योजनेंतर्गत दि.01
ऑक्टोबर, 2024 चे शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे घटकांना अनुदान अनुज्ञेय आहे.
1) नवीन विहीर (रु.4.00 लाख),
2) जुनी विहीर
दुरुस्ती (रु.1.00 लाख),
३) इनवेल बोअरींग (रु.40 हजार),
४.) वीज जोडणी
आकार (रु.20 हजार),
५) पंप संच (रु.40 हजार),6) सोलर पंप ( वीज जोडणी आकार
व पंपसंच ऐवजी )
(रु.
50 हजार),
7) शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण (रु. 2 लाख),
8) सुक्ष्म
सिंचन संच (ठिबक सिंचन संच रु.97 हजार व तुषार सिंचन संच रु.47
हजार),
9) पीव्हीसी/एचडीपीई पाईप ( रु.50 हजार),
10)परसबाग
(रु.5 हजार),
१1) यंत्रसामुग्रीसाठी (बैलचलित/ट्रॅक्टरचलित अवजारे) (रु.50 हजार ) व
12) विंधन विहीर (फक्त
वनपट्टेधारकांसाठी)-(रु.50 हजार अनुदान मर्यादेत)
सदर
योजनांतर्गत अर्ज स्विकृती, लाभार्थी
निवडीपासून ते अनुदान अदा करणेपर्यंतची कार्यवाही महा-डीबीटी पोर्टलद्वारे सुरु
आहे. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात
आलेली आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाशी
संपर्क साधावा.
मार्गदर्शक सुचना - https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/BMKKY%20Guidelines_compressed.pdf
अधिक माहितीसाठी संपर्क -
कृषि अधिकारी पंचायत समिती, गट विकास अधिकारी,पंचायत समिती व कृषि विकास
अधिकारी,जिल्हा परिषद.
Sid band aahe ka
ReplyDeleteनगरपंचायत क्षेत्रातील शेतकर्यांना अन्याय का? या योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. शहर क्षेत्र म्हणून काही इतर पण सुविधा मिळत नाहीत.
ReplyDelete